मना सज्जना हीत माझें करावें।
रघुनायका दृढ चित्ती धरावें॥
महाराज तो स्वामि वायुसुताचा।
जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा॥२२॥
अर्थ --> भल्या मना! माझे एवढे हित कर. कोणते हित? तर श्रीरामाला चित्तात बळकट धरून ठेव. वायुसुताचा स्वामी मारुतीरायासारख्यांनी ज्याचे दास्य पत्करले त्या त्रेलोक्याधीपती रामरायाने जनांचा उद्धार करण्याचे ब्रीद घेतले आहे.